शब्द शेवटचे…दोघा महापुरुषांचे…..

गौतम बुद्ध आयुष्यभर हजारो अनुयायांशी शब्द संवाद साधत होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत होते. महापरिनिर्वाण समयी, गौतम बुद्धांनी उच्चारलेला शेवटचा शब्द होता सम्मसती. हेच शब्द अजून एका महापुरुषाने आपल्या शेवटच्या बोलण्यात सांगितले होते. याला योगायोग म्हणावे कि काय?

ओशो यांच्या शेवटच्या प्रवचनातील हे शब्द-

“गौतम बुद्धाचे शेवटचे शब्द होते, सम्मसती नेहमी लक्षात ठेवा, कि तुम्ही पण बुद्धच आहात……..सम्मसती”

यानंतर दोन दिवसांनी ओशोंनी देह ठेवला. वरील वाक्य हे त्यांच शेवटच वाक्य. दोघा प्रबुद्ध माणसांनी एकाच शब्द बोलून आपला प्रवास संपवणे हा योगायोग आहे हे मान्य करायला कठीण जाते. सर्व संतांचा आयुष्यभर एकाच गोष्टीवर भर होता- तुम्हीच परमेश्वर आहात.तुमच्या आतच ती मूर्ती दडली आहे. शोध आत घ्या. मन बाहेर पळत सुटते. सारखं बाहेर शोध घ्यायला सुरुवात करते. म्हणून, सारखं सांगावं लागते माणसाला- तूच बुद्ध आहेस. आत शोध. बाहेर नको पळूस. आत बघ. सगळं काही आत दडल आहे.

आयुष्यभर बुद्ध सम्मसती चा उपदेश देत होते. ओशोंनी पण आयुष्यभर आतमध्ये शोध घ्यायला सांगितला.माणसाची बाहेर पळण्याची वृत्त्ती किती प्रबळ आहे याची दोघांनाही जाण असावी……

प्रतिक्रिया नोंदवा

Filed under विश्वाचे आर्त

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s